मंत्री नितेश राणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण..
कणकवली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी नतमस्तक झालो. आपला देश आणि आपला राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर सदैव चालत राहणार असल्याची भावना पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
कणकवली येथील बुध्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच बुध्द विहार मधील तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी नगरसेवक संजय मालंडकर, विराज भोसले, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, प्रकाश सावंत, औदुंबर राणे, गौतम खुडकर, किशोर राणे, राकेश राणे, संतोष पुजारे, निसार शेख, अंकुश कदम, सुशील कदम, मयुरी चव्हाण, मेघा सावंत, आर्या राणे, प्रतिक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, किरण जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
