जान्हवी सावंत; अपक्ष उमेदवार अर्चना घारेवर नाव न घेता टिका..
⚡सावंतवाडी ता.१३-: विद्यमान आमदारावर एकही शब्द बोलायला तयार नसेल तर ‘त्या’ अपक्ष महिला उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. असा टोला शिवसेना नेत्या जानवी सावंत यांनी आज आयोजीत मेळाव्यात लगावला आहे.
यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, दहशतवादाचा बागुलबुवा करून दोनवेळा आमदार झालेल्या दीपक केसरकर यांना आता दहशतवाद दिसत नाही का? , आता दहशतवाद कुठे गेला? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. परंतु, आता येथील जनता तुमच्या शब्दात फसणार नसून, तुमचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
