आचरामार्गे अक्कलकोट बसफेरीचा शुभारंभ…

भाविक-प्रवाशांची दीर्घ प्रतीक्षा अखेर पूर्ण.. ⚡मालवण ता.१८-:भाविकांची आणि प्रवाशांची मागणी असलेल्या आचरामार्गे अक्कलकोट बस फेरीचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी मालवण येथून झाला. आचरा येथे बस फेरी येताच आचरा सरपंच व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे स्वागत केले. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून आचरा येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच चंदन पांगे, आचरा उपसरपंच…

Read More

वरवडे येथे भव्य रक्तदान शिबिर; ३६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

⚡कणकवली ता.१८-: कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे (रजि.) यांच्या वतीने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. शिबिराचा शुभारंभ प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या रक्तदान शिबिरात एक महिला रक्तदात्यासह एकूण ३६ रक्तदात्यांनी…

Read More

कणकवलीत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी…

⚡कणकवली ता.१८-: रंगपंचमीचा सण कणकवली शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळाली. मित्रमंडळी व कुटुंबीय एकत्र जमून एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त करत होते. रंग, गुलाल आणि पिचकारीच्या सहाय्याने लहानग्यांनी विशेष मजा केली. काही…

Read More

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१८-: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. स्वामी समर्थ मठ, कळसुली-हर्डी येथे शुक्रवार २० मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत पुण्याहवाचन, अभिषेक, होम-हवन व स्वामींच्या…

Read More

सिंधुदुर्ग पोलीस दलाला नव्या वाहनांची भर; १९ मार्चला हस्तांतरण सोहळा…

⚡सिंधुदुर्ग दि.१८-: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचे हस्तांतरण सोहळा गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार असून, विशेष अतिथी म्हणून गृह राज्य…

Read More

जि प सदस्य रुपेश पावसकर रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला…

⚡कुडाळ ता.१८-: नेरूर-देऊळवाडा जि प मतदार संघातून महायुतीचा पराभव करून निवडून आलेल्या रुपेश पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याबाबतची ग्वाही श्री. पावसकर यांना दिली.

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर…

युवा नेते विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१८- : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता मोपा विमानतळावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. चव्हाण हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Read More

बांद्यात गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणाऱ्या गुढी पाडवा निमित्त बांदा येथे गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून उत्सवी वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.रॅलीची सुरुवात श्री राम चौक, बांदा येथून होणार असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी,…

Read More

सिंधुदुर्ग जि प विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी…

सिधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद ,महिला बालकल्यान समिती १ पद, विषय समिती सभापती २ पदे निश्चित करण्यात येणार आहेत. २५…

Read More

नेमळेतील युवकाची आजारपणाला कंटाळून आत्महत्या…

सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथीलगीतेश भिवा राऊळ या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.गीतेश राऊळ हा नेमळे गावकर कुंभारवाडीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नसल्याने…

Read More
You cannot copy content of this page