Headlines

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनचा उपक्रम ⚡कणकवली ता.२२-: तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले…

Read More

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

⚡सावंतवाडी ता.२२-: झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या जोरदार धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा बळीराम गवस ( ३५, सध्या रा. मळगांव मूळ रा. सासोली हेदूसवाडी दोडामार्ग )असे त्याचे नाव आहे. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. या अपघातात तो जागीच कोसळला व गंभीर इजा झाली. स्थानिकांनी…

Read More

वीज संदर्भात धमकी देत फसवणुकीचे प्रकार

संबंधितवत कारवाई करा : माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडीत वीज जोडणी तोडण्याची धमकी देणारा मॅसेज पाठवत वीज ग्राहकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सदर व्हाट्सअप मेसेज मधील मोबाईल नंबरची माहिती घेऊन चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणीही माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात…

Read More

चुकीच्या सर्वेमुळे आरोस-धनगरवाडीतील पाच कुटुंबे पाण्यापासून वंचित

ताबडतोब फेरविचार न केल्यास घेराव घालणार : सरपंच शंकर नाईक यांचा इशारा ⚡बांदा ता.२२-: आरोस-धनगरवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना मंजूर असून एकूण 25 कुटुंबे राहत आहेत. त्यापैकी पाच कुटुंबे सर्वेतून पूर्णतः वगळण्यात आली. सदर सर्वे चुकीच्या पद्धतीमुळे झाल्याने आम्हाला पाण्यापासून वंचित राहावे लागणार असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा असे…

Read More

डॉ. चंद्रकांत जेवरे यांचे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील शहरातील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे काल रात्री दहा वाजता माजगाव पंचम नगर मधील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. आज त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते.

Read More

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम

⚡कणकवली ता.२१-: युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी तसेच प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्थेचे खजिनदार मंदार सावंत आणि कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांच्या हस्ते झाले. प्रथम सरस्वती प्रतिमा पूजन व…

Read More

वायंगणी माळरानावर सापडला अर्धवट जळलेला मृतदेह

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला असून यामुळे खळबळ उडाली आहे. हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून घातपाताचा संशयही व्यक्त केला जात असून याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत…

Read More

कणकवलीतील एअरटेल नेटवर्क प्रश्न निकाली

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी ⚡कणकवली ता.२१-: कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेलचा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडीसह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू करण्याकरिता…

Read More

विद्यार्थ्यांनी अधिकारी बनून जिल्हा नावारूपास आणावा

प्रा रुपेश पाटील यांचे हळदीचे नेरूर येथे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२१-: संपूर्ण राज्यात शालेय गुणवत्तेचा मानबिंदू ठरलेला, कला व सांस्कृतिक कामगिरीने महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर अग्रगण्य असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत अजूनही खूप मागे आहे, ही बाब आपल्या जिल्हावासियांना निश्चितच खेदजनक असून सिंधुदुर्ग जिल्हा आगामी काळात अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपास येण्यासाठी विद्यार्थ्यांची…

Read More

जनतेच्या समस्या सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश

माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप देवगड ता.२१-:देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर एक वर्षाची वचनपूर्ती पाहिली असता सत्ताधारी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना सातत्याने या भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरता अपयश आले असून आपले अपयश लपविण्यासाठी मागील पाच वर्षात देवगड जामसंडे मधील जनतेला अभिप्रेत असलेला विकास झाला असल्याने स्थानिक आमदारांच्या नावाने अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी…

Read More
You cannot copy content of this page