Global Maharashtra Breaking News

आरवली सोंसुरेतील सद्गुरू बालदत्तनाथ महाराजांचा ९० वा वाढदिन साजरा

धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन *⚡वेंगुर्ले ता.१६-:* आरवली सोंसुरे येथील सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा ९० वा वाढदिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनादी सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्था आरवली सोंसूरे येथील धर्म क्षेत्राचे संस्थापक सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी कार्यक्रम…

Read More

वेळागर येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था खारे पाणी माड बागातीत घुसून होतेय नुकसान

प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची ग्रामस्थाची मागणी *⚡वेंगुर्ले ता.१६-:* तालुक्यातील शिरोडा वेळागरला सध्या समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मोठा तडाका बसत असून किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरक्षेसाठी बांधलेल्या एक किलो मीटर लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची दैनावस्था झाली आहे. बंधाऱ्याचे दगड व जाळी फाटून वाहून गेली. तसेच समुद्राचे खारे पाणी आता माड बागायतीमध्ये घुसून नुकसान होत आहे….

Read More

*शासन तळाशील ग्रामस्थांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम करत आहे

मनसे सरचिटणीस परशूराम उपरकर यांनी टीका *⚡मालवण ता.१६-:* समुद्री अतिक्रमणामुळे तळाशील गावचे दोन तुकडे झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आतापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र तसे प्रयत्न शासन व लोकप्रतिनिधींकडून होताना दिसत नाही. समुद्र व खाडीच्या अतिक्रमणापासून धोका निर्माण झालेल्या तळाशील गावातील लोक समुद्रात बुडून मरतील की काय अशी स्थिती सरकारने आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींनी करून ठेवली आहे….

Read More

मातृत्व आधार फाउंडेशनने प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची समाजाने घेतली दखल

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांचे प्रतिपादन *⚡मालवण ता.१६-:* कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करते तेव्हा लोक उदार हस्ते मदत करतात गेल्या वर्षभरात मातृत्व आधार फाउंडेशनने केलेल्या कार्याची दखल समाजाने घेतल्याने मातृत्वने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी येथे…

Read More

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय प्रतिमेला पुष्पहार अर्पण

*⚡कणकवली ता.१६-:* माजी पंतप्रधान तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्ह्यध्यक्ष राजन तेली,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष कमलाकांत उर्फ बाळू कुबल,महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण ,कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप…

Read More

संजय तांबे यांचे कथा लेखन म्हणजे आजचे समाज वास्तव

विविधा’ कथासंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी सोळांकूरकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१६-:* लेखक संजय तांबे यांचे कथालेखन आजचे वास्तव प्रखरतेने मांडते. त्यांच्या कथेतील संवेदनशीलता माणसातील चांगुलपणाला साद घालते. त्यांच्या कथा छोट्या असल्या तरी ते जे सांगू पाहतात त्यातून वाचक अंतर्मुख होत जातो. ही त्यांच्या कथालेखनाची मोठी गुणवत्ता असून भविष्यकाळात त्यांनी सातत्याने आपले कथालेखन करत राहावे असे प्रतिपादन…

Read More

युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात

तुतारी एक्सप्रेसमधील घटना *⚡सांवतवाडी ता.१६-:* तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईवरून सावंतवाडी असा प्रवास करणाऱ्या मळेवाड येथील एका युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवम कुमार (१९) व शिवा कुमार (१९) दोघे रा. उत्तरप्रदेश, अशी संशयितांची नावे असून त्यांना सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चोरट्यानी प्रवासादरम्यान युवतीच्या बॅगमधील…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ७५२कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १,हजार९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

आम वैभव नाईक यांचे आश्वासन धुडकावून लावत तळाशील ग्रामस्थांचे बंधाऱ्यासाठी बेमुदत उपोषण सुरूच

आम नाईक यांच्या भूमिकेमुळे काही काळ वातावरण तंग : ग्रामस्थ लेखी मागणीवर ठाम *⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झालेल्या तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या गेल्या कित्येक वर्षाच्या मागणीकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त बनलेल्या तळाशील च्या ग्रामस्थांनी आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला भाजप, मनसे, तसेच…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागण्यासाठी देण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक दोन कचराकुंड्या आणि प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद होण्याच्या हेतूने एक कापडी व एक नायलॉन पिशवीचे वाटप प्रातिनिधीक स्वरुपात १५ ऑगस्ट रोजी स्वच्छता मित्रांना करुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर,…

Read More
You cannot copy content of this page