Global Maharashtra Breaking News

परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्यासाठी २२ रोजी मनसे देणार पोलीस स्थानकांना निवेदने

मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡मालवण ता.१५-:* राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांच्या नोंदी ठेवाव्यात अशी मागणी मनसेने गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे लावून धरली असताना साकीनाका येथील अत्याचार प्रकरणानंतर शासनाला जाग आली असून परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय मोठ्या संख्येने येत असून केंद्राच्या राज्य स्थलांतर कायद्या अंतर्गत…

Read More

कोरोना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

सेवेतून कमी केल्याने कर्मचारी आक्रमक;पुन्हा सेवेत घेण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी ता १५ कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योध्याना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज (बुधवारी )जि.प.समोर ठीय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव…

Read More

निधी पास्ते आत्महत्या प्रकरणी चौघांना जामीन

*⚡सावंतवाडी ता.१५-:* कलंबिस्त येथील नवविवाहिता सौ. निधी पास्ते हिच्या आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघांची आज जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. याकामी ॲड.परिमल नाईक व सुशील राजगे यांनी काम पाहिले.

Read More

बांदा-पत्रादेवी मार्गावर बेकायदा दारु वाहतुकीवर कारवाई

*⚡बांदा ता.१५-:* गणेशोत्सव सुरू असताना गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात ३५ दारुचे बॉक्स व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रथमेश प्रभाकर राऊळ (२६, रा. मोरेवडाचे टेंब,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६१९कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

ह. भ. प. आण्णा महाराज परब यांचे देहवासन

*⚡कणकवली ता.१५-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष , संत सेवा पुरस्कार प्राप्त कीर्तनकार, विणेकरी ह. भ. प अनंत विष्णू तथा अण्णा महाराज परब (91) रा. आंब्रड यांचे बुधवारी सकाळी देहवासन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पुतणे, असा मोठा परिवार आहे.

Read More

बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे

कणकवलीतील संतांच्या मानाच्या गणपतीला गाऱ्हाणे *⚡कणकवली ता.१५-:* नवसाला पावणारा अशी ओळख असलेला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा ईतिहास असलेल्या कणकवली शहरातील संतांच्या मनाच्या गणपतीचे आमदार वैभव नाईक यांनी दर्शन घेतले. यावेळी येथील ज्येष्ठ दाजी सावंत यांनी बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर असे गाऱ्हाणे या गणपतीला घातले. नवसाला…

Read More

मळगाव येथील माळी घराण्याच्या गणपतीचे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

*⚡सावंतवाडी ता.१५-:* मळगाव येथील प्रसिद्ध असणारा माळी घराण्याचा तब्बल ७० एकत्रित कुटुंबाचा गणपतीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापारी विभाग कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व्यापारी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा देसाई, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफतिका राजगुरू, तालुका कार्यकारिणी सदस्य बावतीस फर्नांडिस, तालुका सदस्य सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.

Read More

वेंकिज कंपनी सुरू होणार माणगाव खोऱ्यात

विशाल परब यांनी केली होती मागणी;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रयत्न *⚡कुडाळ ता.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेकिंज कंपनी यावी अशी मागणी भाजप युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वेंकिज कंपनीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही कंपनी माणगाव…

Read More

भगवंतगड येथील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती

नजीक असलेल्या घराला धोका भिंत बांधण्याची माळगावकर कुटुंबाची मागणी *⚡मालवण ता.१५-:* आचरा भगवंतगड रस्त्याला गटार नसल्याने सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे भगवंत गड येथील माळगांवकर वाड्यालगतची संरक्षक भिंत कोसळून घराला धोका निर्माण होण्याबरोबरच रस्ता ही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची तातडीने दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी माळगांवकर कुटूबियांनी केली आहे. भगवंत…

Read More
You cannot copy content of this page