घरकुल योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा
मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची मागणी *⚡ओरोस ता.०९-:* प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रपत्र ड मूळ यादीतील जिल्ह्यातील जवळपास 17 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र शासनाच्या जाचक व कठोर नियमावलीने केले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली असताना स्वतःजवळ वाहन असणे,फिशिंग बोट, कृषी अवजारे, किसान क्रेडिट कार्ड, फ्रीज असणे हा मातीची घरं…
