डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात कुडाळ येथील चालक जागीच ठार…

⚡सावंतवाडी ता.०६:-: चालकाचा ताबा सुटून डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात कुडाळ-गोवेरी भगतवाडी येथील चालक जागीच ठार झाला. सिद्धेश सखाराम पालकर (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत प्रथमेश तेरसे (रा.कुडाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

वागदे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

कणकवली: वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे ( वय ३३, रा. वागदे,गावठणवाडी )हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम करत असे. सागर याने आत्महत्या का केली ? हे अजून स्पश्ट झालेले नाही. मात्र, त्याला…

Read More

संजू परब यांच्या हस्ते निगुडेतील गावठणवाडी व नवीन देऊळवाडी खडपकर पाटेकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न…

बांदा: आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निगुडे गावातील गावठणवाडी व नवीन देऊळवाडी खडपकर पाटेकरवाडी या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब तसेच तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी श्री. परब यांचे…

Read More

सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास धामापूरकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…!

⚡बांदा ता.०६-: बांदा आळवाडा तेली तिठा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास यशवंत धामापूरकर (वय ७२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज सकाळी 11.30 वाजता बांदा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. हॉटेल व्यवसायिक यतिन धामापूरकर आणि तुषार धमापुरकर यांचे ते वडील तर निवृत्त शिक्षिका अनुराधा धमापुरकर यांचे ते पती होत.

Read More

दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्ती घेण्यापूर्वी मतदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा…

रामचंद्र सावंत:केसरकर यांनी एका एकी राजकीय निवृत्ती घेऊ नये.. ⚡दोडामार्ग,ता-०६:- माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच राजकीय निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली आहे, हा निर्णय केसरकर यांनी घेण्यापूर्वी मतदारांना विश्वासात घेऊनच या निर्णयाची घाई करावी असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी बोलताना व्यक्त केले, सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने चौथ्यांदा आमदारकी बहाल…

Read More

कणकवली कॉलेजचा तन्मय सावंत तालुक्यात प्रथम…

९ विद्यालयांचा निकाल १०० ; तालुक्याचा निकाल ९९.२२ टक्के.. ⚡कणकवली ता.०५-:महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कणकवली तालुक्याचा ९९:२२ % एवढा निकाल लागला आहे. तालुक्यात प्राप्त निकालानुसार प्रथम  येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी तन्मय संजय…

Read More

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९९.३६ टक्के…

मालवण, दि प्रतिनिधी फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे. परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय…

Read More

बारावी परीक्षा ; कुडाळ तालुक्याचा निकाल ९८.२० टक्के…

कुडाळ : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२५ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कुलची आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के) प्रथम, द्वितीय चैत्राली राजे डॉन बॉस्को, ओरोस (९५ टक्के) , तृतीय पूनम चंद्रशेखर पुनाळेकर (९३.६७ टक्के), व हर्षदा दत्तदास सामंत (९३.६७ टक्के) (दोन्ही कुडाळ…

Read More

बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के…

सावंतवाडी : बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या 1 हजार 621 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा तनुज परब 94.83 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आरपीडीची वाणिज्य शाखेची तझीन खान 94.67 टक्के गुणांसह द्वितीय तर अब्दुला शेख 92.83 टक्के (वाणिज्य) व…

Read More

आंबोली धबधबा येथे तेलंगना च्या पर्यटकांना मारहाण…

आंबोली,ता.५: आंबोली घाटातील स्टॉल धारकाने पाचशे पाच रुपये बिलापैकी 5 रुपयावरून तेलंगणा येथील पर्यटकांना मारहाण केल्याने त्यातील एकाच्या डोक्यावर पाण्याचा जग मारल्याने गंभीर जखमी झाला.यात चौघांना मारहाण करण्यात आली. यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्या नंतर येथील डॉ.महेश जाधव व आदिती पाटकर यांनी उपचार केल्या नंतर सावंतवाडी येथे १०८ ने पाठवण्यात आले.या नंतर पोलीस हवालदार…

Read More
You cannot copy content of this page