सरपंच संवाद मोबाईल ऍप लाँच…

जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी करावा डाऊनलोड:मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे आवाहन.. ओरोस ता ५स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी “सरपंच संवाद” हे मोबाईल…

Read More

कुडाळच्या नारळी पौर्णिमेच्या रॅलीत एकच रिक्षा ; पोलिसांचे निर्देश…

महाविकास आघाडीला निर्णय मान्य तर महायुतीला निर्णय अमान्य:पोलिसांच्या भूमिकेकडे कुडाळवासीयांचे लक्ष.. कुडाळ  : कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्तिने होणाऱ्या रिक्षा मिरवणूक रॅलित दोन्ही गटाने माणसे कितीही आणा पण रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा आणा अशा सक्त सूचना महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. कुडाळ पोलीस निरीक्षकांचा…

Read More

अंबोली ग्रामपंचायतीतर्फे पर्यटन विकासासाठी विशेष स्पर्धा…

⚡आंबोली ता.०५-: लाखो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबोली गावात यावर्षी ‘अंबोली मान्सून महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. अंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंबोली मान्सून महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या माध्यमातून अंबोलीला एक नवीन ओळख मिळणार आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता श्री. देवी माऊली मंदिर जवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दिली धडक…

सावंतवाडी: एका कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात रोजी श्री. निशिकांत तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय, सावंतवाडी येथे धडक दिली. यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी, स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश केंद्रीय स्तरावरून आल्याचे सांगितले. त्यांनी हे लेखी स्वरूपात दिल्यानंतरही, हे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यापुढे…

Read More

विनापरवाना बंदुका प्रकरणी पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…!

कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ आणि आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (दोघेही रा. माणगांव) या दोघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी यशवंत राजाराम देसाई (आजरा-कोल्हापूर), प्रकाश राजाराम गुरव (आजरा) आणि सागर लक्ष्मण घाडी (नांदरुख-मालवण) यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडी…

Read More

सैन्याच्या एनसीसी भरती प्रक्रियेत १८ विद्यार्थ्यांची निवड…

⚡मालवण ता.०४-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही एअर फोर्स, पोलीस, तटरक्षक दल व इतर संरक्षण दलामध्ये आपले करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार आर्मी विभागाकडून एनसीसी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी सहभागी झालेल्या ३२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी अशा १८…

Read More

कणकवलीतील महसूल विभागाच्या नऊ मंडळांमध्ये महाराजस्व अभियान संपन्न…!

⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दिनांक १ ते ७ ऑगस्ट २२०५ या कालावधीत महसूल सप्ताह -२०२५” साजरा येणार आहे. त्यानुसार कणकवली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय नऊ ठिकाणी ४ ऑगस्ट रोजी राबविण्यात आला. या उपक्रमात महसुल विभागाच्या विविध योजनांची जनजागृती व नागरिकांना सेवा…

Read More

जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव गोड जाणार…

सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांचे राज्य शासनाचे थकीत मानधन मिळणार:जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माहिती.. ⚡ओरोस ता ४-: जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव गोड जाणार आहे. सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांचे राज्य शासनाचे थकीत मानधन त्यांना मिळणार आहे. यासाठी ४ कोटी ६४ लाख ६०…

Read More

स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा…

गजानन कांदळगावकर:दैवज्ञ समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा.. ⚡कुडाळ ता.०४-: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना स्पर्धा वाढली आहे. यश सहज सोपे नाही. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) आपण कितीही नाकारले तरी आपल्याला त्याला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही ध्येय निश्चित करा पुढे जाण्याची क्षमता आपल्या समाजातील मुलांमध्ये आहे. आताच करिअर  निवडा. भविष्यात आपल्या समाजातील मुले आनंदी जीवन जगताना  व्यवसायिक…

Read More

पिंगुळीत फास लावलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.०४-: पिंगुळी मुस्लीमवाडी येथील बरकत अल्लीदाऊद खान ( 38) यांने स्वयंपाक घरातील लोखंडी बारला ओढणीने गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर बिलाल रहीमतुल्ला शेख रा पिंगुळी मुस्लीमवाडा याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सकाळी सात वाजता बरकत खानचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत घरात आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Read More
You cannot copy content of this page