आषाढी एकादशी निमित्त कलमठ मधील श्री गणेश माँटेसरी च्या बलचमूंची वारकरी दिंडी…

⚡कणकवली ता.१७-: श्री गणेश माँटेसरी ने २१ वर्षांची परंपरा अखंडीत ठेवत या वर्षी सुध्दा त्याच उत्साहात ही भक्तिमय दिंडी संपन्न झाली. विठ्ठल – रुक्मिणी सह विविध संतांच्या वेशभूषेमध्ये बालचमू अगदी एकरूप झाले होते. तांबे भवन पासून सुरू झालेली दिंडी कलमठ बाजारपेठ विठ्ठल मंदिर इथे छोटासा सांस्कृतिक करून भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पालकांनी सुद्धा उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला होता.यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, अनंत हजारे, बंडू दंताळ, आबा ढवण, अनिल मेस्त्री, विनय कोरगावकर, विनय कोरगावकर, संजय हजारे, हरिश्चंद्र कुडतरकर माँटेसरी प्ले स्कूलचे शैलेजा मुखरे, स्नेहल राणे, श्रुती राणे, संजीवनी कडूलकर आणि पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page