प्रमोद जठार:रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल…
सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारी वाढला जबाबदार खासदार विनायक राऊत आहेत. ते या पापाचे धनी आहेत. निधी कसा आणावा याची कल्पना देखील त्यांना नाही. केवळ रिफानरी, सी-वर्ल्ड सारख्या विकासकामांना विरोध करणारे विकासात तंटा आणणारे ते खासदार होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे असं मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केल. तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा आमचा उमेदवार असेल, महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही ही निवडणूक लढू. अनेक जण या जागेसाठी इच्छुक आहे. इच्छुक असण गैर नाही. भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू असा विश्वास भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख, माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गड असून आमची पहिली पसंती त्यांना आहे असं मत श्री. जठार यांनी व्यक्त केल.
