कोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू..

⚡दोडामार्ग ता.०४-:
कोनाळ तिलारीवाडी येथील ब्रह्मानंद शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यावेळी वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ , वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस,बाळकृष्ण सावंत, वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ आदींच्या पथकाने पाहणी केली. विहिरीतून दोन्ही गव्यांना बाहेर काढून विच्छेदन करण्यात आले.त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page