वनविभागाने तात्काळ योग्य ती दखल घेवून कारवाई करावी:सरपंच सावित्री पालेकर यांची मागणी..
⚡आंबोली ता.०१-: आंबोली येथे गेले चार ते पाच दिवस रानटी हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांना हुसकावून लावले तरी ते परिसरात पुन्हा येत असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.त्यामुळे वनविभागाने तात्काळ योग्य ती दखल घेवून कारवाई करावी ,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी दिला आहे.
