*💫बांदा दि.०१-:* इन्सुली गावकरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ८ एकर काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुपारच्या वेळी आग लागल्याने सुमारे २०० हून अधिक काजू कलमे, आंबा, फणस आदी झाडे जळून सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावकरवाडी येथील आपट्याचे भरड येथे नाना पाटकर यांच्या काजू बागायतीमध्ये आग लागली. आगीचे लोळ पाहून ग्रामस्थांनी आगीची माहिती पाटकर यांना दिली. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविणे कठीण होते. मात्र शेतकर्यांनी आटोकाट प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
इन्सुलीत आठ एकर बागायती आगीच्या भक्षस्थानी….
