कबुलायतदार जमीन प्रश्न अर्धवट सोडवून पाठ थोपटून घेण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर सत्कार करू…

उद्धव ठाकरे सेनेकडून भूमिका: आंदण दिल्याप्रमाणे आंबोलीत वाटेल ते ठरवू नका…

⚡आंबोली,ता.१२-: अनिल चव्हाण. राज्यसरकारचे मंत्री आणि त्यांचे पक्ष हे जमीन प्रश्न सोडवला म्हणून जाहिरात करत आहेत.प्रत्यक्षात हा प्रश्न पूर्ण सोडवण्याची जबाबदारी ही राज्याचीच आहे. त्यामुळे अर्धा प्रश्न सोडवून पाठ थोपटण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही मिरवणुकीने जाहीर सत्कार करू असे उद्धव ठाकरे सेनेतर्फे बबन गावडे यांनी म्हटले आहे.

येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नी मंत्र्यांनी पाठ थोपटून घेतली तरी लोकांना गृहीत धरू नये. हा प्रश्न अर्धाच सोडवला असून तो पूर्ण सोडवणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे.राज्यानेच तो निर्माण केला होता.केंद्रीय वनखात्याकडे राज्य सरकारनेच ३५ सेक्शन खाजगी वनसंज्ञा वगळण्यासंबंधी प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे.आणि तो मंजूर करून घेणे आवश्यक आहे.जेवढ्या जागेत कबुलायतदार गावकर क्षेत्र लागले होते तेवढे क्षेत्रातील नोंदी रद्द करणे आवश्यक आहे. हे काम खरोखर प्रश्न सोडवायचा असेल तर अतितात्काळ करणे आवश्यक आहे.आता अधिवेशन सुरू होईल त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आचारसंहिता आणि मग ऑक्टोबर नंतर लोकसभेच्या निवडणुक प्रक्रिया यामुळे हा प्रश्न पुन्हा रखडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे सरकारला खरोखर हा प्रश्न सोडवायचा असेल तर तो महिन्यात सोडवुन दाखवावा.केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत मग प्रश्न सुटायला हवा.,केवळ कॅबिनेट बैठक झाली २४ वर्षात. त्यामुळे लोकांना स्वप्न दाखवणे सोडावे. हा प्रश्न समूळ सोडवला तर आम्ही जाहीर सत्कार करू.केवळ अर्धा प्रश्न सोडवून पुन्हा भिजत घोंगडे.हा अर्ध्या प्रश्न सोडवण्यामागे तरी कोणता उद्देश आहे तेही स्पस्ट होत आहे. तसेच गाव आंदण दिल्याप्रमाणे वाटेल ते ठरवण्याची मुभा तुम्हाला कोणी दिली नाही.गावातील मुलांसाठी कोणत्या सुविधा नाही शिक्षक नाही.मात्र भलत्याच घोषणा केल्या जात आहेत जणू काही खाजगी यांच्याच पूर्ण गाव मालकीचा आहे.स्थानिकांचीच मुले बाहेर शिकायला जात आहेत. मात्र आंबोलीत बाहेरच्या मुलांसाठी शाळा काढायच्या घोषणा करायच्या.सैनिक शाळेसाठी देखील आंबोलीतील जागा दिली.स्थानिकांना विचारून निर्णय घेणे आवश्यक आहे.स्थानिक मुलांसाठी शाळेसाठी सुविधा आहेत काय याचा विचार देखील कधी होताना दिसत नाही.स्थानिकांना रोजगार उद्योग मिळण्याच्या फक्त घोषणा त्यातील कोणतं पूर्ण होताना दिसत नाही. सध्या जमीन प्रश्न सोडवला म्हनून जाहिरात आहे मात्र ग्रामस्थांना प्रत्यक्षात काही मिळेल तेव्हा खरे.त्याचवेळी आम्ही आपला जाहीर सत्कार करू.असे ठाकरे शिवसेनेतर्फे बबन गावडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page