शिंदे गटातील आमदारांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न…

रुपेश राऊळांचा आरोप, रामदास कदम यांचा शिवसेनेकडून सावंतवाडी निषेध..

⚡सावंतवाडी ता.२१-: शिंदे गटातील आमदार रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर बेताल वक्तव्य करत असून, शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असलेली शांतता भंग होऊन महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे पूर्णपणे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. यावेळी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा सावंतवाडी शिवसेनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा,अपर्णा कोठावळे, बाळ गावडे , शब्बीर मनियार,गुणाजी गावडे, बाळू माळकर, रमाकांत राऊळ,प्रकाश सनाम , संतोष गावडे, आबा सावंत, शरद जाधव, सच्चिदानंद फुगडे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page