अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
अष्टपैलू संस्कृती कला अकॅडमी मुंबई आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत व शिक्षकांचे तसेच आईवडील सौ. राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.
