मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा

नितीन गडकरी यांचे आदेश;खासदार विनायक राऊत यांनी वेधले लक्ष

ओरोस : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन पॅकेजचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या पॅकेज सहाअंतर्गत आरवली ते कांटे आणि पॅकेज सातअंतर्गत कांटे ते वाकेड या दोन पॅकेजच्या रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार गडकरी यांनी अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली होती. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.

You cannot copy content of this page