घाटातील खचलेल्या साईडपट्टी चे केले काँक्रीटीकरण
*⚡आंबोली ता.१०-:* घाटातील जीओ केबल मुळे घाट खचनार असल्याबाबत सर्वप्रथम वृत्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनलने दिले होते.सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. जियो केबल मुळे दरीच्या बाजूने त्यात पाणी जावून खाच पडून घाट खचण्याच्या स्थितीत होता. खाचरे पडली होती. याबाबत अनिल चव्हाण यांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते.याबाबत सर्वप्रथम ग्लोबल महाराष्ट्र ने सर्वप्रथम वृत दिले होते.त्याची दखल घेवून काँक्रिट घालून आज साईड पट्टी बुजवण्यात आली.तसेच घाटातील गटारीचे काम सुरू आहे.आज शाखा अभियंता आदर्श पाटील , सुपरवायझर श्री.राणे उपस्थित होते.
