⚡वैभववाडी ता.१७-: अचिर्णे धनगरवाडा येथील शेतकरी राजाराम बाबू शिंगाडे यांच्या हाता तोंडाशी आलेल्या दोन एकर मधील काजू बागेला वनवा लागून काजू झाडे जळून खात झालेने बागेचे मोठे नुकसान झाले.
रविवारी दुपारी तीन च्या सुमारास आचल्य धनगरवाडी येथील शेतकरी राजाराम शिंगाडे यांच्या दोन एकर मधील हाता तोंडाशी आलेल्या 130 काजूच्या झाडाचे जळून मोठे नुकसान झाले सदर घटनेचा प्रशासनाने पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला आर्थिक मदत करावी असी मागणी शेतकरी राजाराम शिंगाडे यांनी केली आहे.
