शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे बाळू सावंत यांचे आवाहन..
बांदा/प्रतिनिधी
रब्बी हंगाम मोबाईल ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ जानेवारी असून शेतकऱ्यांनी या कालावधीपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.
ई पीक पाहणीची सुरुवात १ डिसेंबर पासून करण्यात आली आहे. त्याची अंतिम मुदत हि १५ जानेवारी आहे. ई पीक नोंदणी सर्व शेतकऱ्यांनी करणे बंधनकारक आहे. ई पीक न केल्यास चालु आर्थिक वर्ष (२०२४-२५) चा सातबारा उतारा काढता येणार नाही, कोणत्याही प्रकारचे शेती कर्ज करता येणार नाही, पीक विम्याची रक्कम मिळणार नाही, सातबारा क्षेत्र हे पडीक दाखविण्यात येणार आहे, सातबारा उताऱ्याशी संबंधित कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, खरेदी विक्रीसाठी अडचण निर्माण होईल, भविष्यात नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई- पंचनामे होणार नाहीत.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ई -पीक पाहणी अँप डाउनलोड करून तात्काळ आपल्या पिकांची नोंदणी करावी असे सावंत यांनी आवाहन केले आहे.