⚡कणकवली ता.०८-: संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी कच्चे, वनराई बंधारे बांधून पाणी अडवले जाते. या वर्षी कणकवली तालुक्याला एक हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पंचायत समितीच्या माध्यमातून ४ व ५ डिसेंबर हा बंधारा दिवस साजरा करण्यात आला. यात तालुक्यात दोन दिवसांत ३५० बंधारे बांधण्यात आले आहेत.
या वर्षी कणकवली तालुक्याला १ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यात नियोजन करण्यात आले असून, दोन दिवसांत ३५० बंधारे बांधण्यात आल्यानंतर पुढील ८ दिवसांत हे बंधारे पूर्ण करण्याबाबतचे नियोजनही आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ४ व ५ डिसेंबर रोजी गावागावांत बंधारे बांधण्यात आले.
नागवे येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्य वेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, मनीषा देसाई, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, राजू शिंदे, प्रमोद ठाकूर, विठ्ठल ठाकूर, प्रथम जाधव, संजय कवठकर, शाखा अभियंता गणेश कडुलकर, विनायक चव्हाण तसेच सरपंच, उपसरपंच, स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
