पथविक्रेत्यांनी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा-: गौरी पाटील…!
⚡कणकवली ता.२१-: पथविक्रेते, लघुउद्योजक आणि कुटुंबांना अधिक काळासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेचा कर्जकालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविला आहे. शहरातील सर्व फेरीवाले – भाजी, फळ, मच्छी, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हातगाडीधारक – यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतच्या…
