Global Maharashtra Breaking News

प्रसिद्ध उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे निधन

*💫दोडामार्ग दि.३०-:* तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष तसेच लाकूड व्यापारी संघटना दोडामार्ग चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांचं रविवारी रात्री गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

पाडलोसमध्ये रस्त्यावर दहाफुटी मगर….

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण; पाळीव जनावरांना धोका; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी *💫बांदा दि.२९-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 जवळ दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका महाकाय आठ ते दहा फुटी मगरीचे दुचाकीस्वारास दर्शन झाले. केणीवाडा येथे मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर हिच तर नव्हे ना, अशा भितीदायक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी…

Read More

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्या प्रकरणी डिगस येथील युवक ताब्यात

*💫कुडाळ दि.२९-:* कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला डिगस राणेवाडी येथील संशयित संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ याला कुडाळ पोलिसांनी मोठ्या शिथाफिने ताब्यात घेण्यात अखेर यश मिळवले आहे. डिगस येथील घरी आला असताना या संशयिताला त्याच्या राहत्या घरातूनच पहाटे ५ वा.तर या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी परिसरातून…

Read More

युवराज वारंग मृत्यू प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती कुडाळ प्रतिनिधी:- हळदीचे नेरूर येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवराज वारंग (१८) या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आता काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. युवराज याच्या गोळी लागुन मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी युवराज याच्याबरोबर शिकारीसाठी…

Read More

वायरी येथील तरुणाची आत्महत्या

*💫मालवण दि.२९-:* मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर…

Read More

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

*रावजी यादव यांचा इशारा* *💫सिंधुदुर्गनगरी दि२९-:* : महाराष्ट्र केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या नाविन्यपूर्ण योजना काढलेल्या आहेत या योजना तळागाळातील शोषित पिढी समाजापर्यंत पोचलेल्याच नाही, या संदर्भात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे २६ जानेवारीपासून शोषित पीडित समाजाच्या विविध समस्यांबाबत आंदोलन सुरू करण्यात आले आहे, हे आंदोलन अजूनही सुरू असून…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आमच्या कामगार संघटना सिंधुदुर्गात काम करणार-घनश्याम नाईक…

कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी;हिंद भारतीय जनरल कामगार सेना व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना जिल्ह्यात काम करेल… *💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता औद्योगिक उभारणी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मालगाड्या येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना संघटित करून न्याय देण्याच्या दृष्टीने निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या दोन संघटना कार्यरत आहेत.त्यानुसार हिंद…

Read More

श्री.देव स्वयंभू जत्रोत्सवाला प्रारंभ भाविकांची दर्शनाला रीघ

विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ *💫कणकवली दि.२९-:* कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू – श्री.रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वयंभू मंदिरात सकाळपासूनच भाविक- भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जत्रौत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री देव स्वयंभू मंदिर परिसरात विविध प्रकारची…

Read More

कणकवली कॉलेज येथे ५ डिसेंबरला मोफत भरती पूर्व प्रशिक्षण…

*💫कणकवली दि.२९-:* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे मार्फत मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२० पासुन कणकवली कॉलेज कणकवली येथे सुरु होणारे हे मोफत प्रशिक्षण राज्य सरकारची पोलिस भरती होईपर्यन्त चालणार आहे. या प्रशिक्षणात लेखी व मैदानी प्रशिक्षणाचा अंतर्भाव असणार आहे.या प्रशिक्षण शिबिरात…

Read More

कोरोनाच्या नवीन लाटेमुळे आंबोलीतील वर्षांपर्यटनावर परिणाम

*पर्यटकांनी आंबोलीकडे फिरविली पाठ *💫आंबोली दि.२९-:* कोरोनाच्या पुन्हा येणाऱ्या नवीन लाटेमुळे लॉकडाऊनच्या बातमी मुळे आंबोलीतील रविवारच्या वर्षांपर्यटनावर परिणाम झाला आहे. असंख्य पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. त्यामुळे याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. गोवा सिमेवर तपासणी केंद्र पुन्हा सुरु केल्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकात पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे व्यवसाईकात नाराजी निर्माण झाली. कोरोनाच्या…

Read More
You cannot copy content of this page