Global Maharashtra Breaking News

खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद

शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय 💫खारेपाटण दि.२२-: मुसळधार पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी ३ नंतर प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात आला आहे. खारेपाटण शुक नदीने रौद्र रूप धारण केले असून पुराच्या पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे.तर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज…

Read More

वाघोटन नदीने ओलांडली इशारापातळी…

💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: आज सायंकाळी 4 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली असून खारेपाटण पुलाजवळ या नदीची पातळी 8.900 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. वाघोटन नदीची इशारा पातळी 8.500 मीटर आहे तर धोका पातळी 10.500 मीटर आहे. तर भंगसाळ पुलाजवळ मोजण्यात आलेल्या कर्ली नदीच्या पाणीपातळीनुसार या…

Read More

अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी 💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: जिल्ह्यामध्ये 25 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सद्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे….

Read More

जिल्ह्यात आज आणखी 163 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 42 हजार 532 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 163 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

चंद्रकांत नाईक यांचे निधन

💫वेंगुर्ला दि.२२-: शिरोडा-बागायतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत तथा कांता सावळाराम नाईक (७५) यांचे २१ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, २ मुली, सूना, जावई, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

भाजपाच्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ…

💫वेंगुर्ला दि.२२-: भाजपातर्फे पक्षवाढीसाठी तसेच बुथप्रमुख व बुथसमीती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत. या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या माध्यमातून बुथसमीती गठीत करुन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ आरवली-सागरतीर्थ येथे करण्यात आला.

Read More

खारेपाटण पूरस्थितीची प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार पवार यांनी केली पाहणी…

💫कणकवली दि२२-: मुसळधार पावसामुळे खारेपाटण मध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुपारी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण गावाला भेट दिली व येथील पुरपरस्थितीची पाहणी केली. या यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर,मंडल अधिकारी मंगेश यादव,ग्रामविकास अधिकारी जि.सी .वेंगुर्लेकर,तलाठी के. वाय. सिंगनाथ,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस प्रमुख उद्धव…

Read More

नगराध्यक्ष संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढण्यास आमदार नितेश राणे यांनीच सांगितल

गटनेत्या अनारोजीन लोबो यांचा गौप्यस्फोट 💫सावंतवाडी दि २२-: राणेंच्याबाबतीत नगराध्यक्ष संजू परब यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आमदार नितेश राणे सावंतवाडीत आले त्यावेळी त्यांनी आपल्याला नगराध्यक्ष संजू परब यांच्या भानगडी बाहेर काढा, अस सांगितल, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर,…

Read More

राष्ट्रवादी सावंतवाडीच्यावतीने उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी निधी दिल्याबद्दल मानले आभार सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कोव्हीड नियमांच पालन करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, आरोग्य, कोरोना परिस्थितीत कोट्यवधीचा…

Read More

मुसळधार पावसामुळे नांदगावात पूरस्थिती ;अनेक रस्ते झाले बंद

💫कणकवली दि.२२-: आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदगाव परिसर पाण्याखाली गेले आहेत. बरेच मार्ग बंद झालेले आहेत. यात मुख्यतः नांदगाव ओटव रस्त्यावरुन नदीचे पाणी वाहू लागले असून २ फुटाच्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे .नांदगाव ओटव संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. नांदगाव-कुंभारवाडी ,पाठवणेवाडी ,वाघाचीवाडी तसेच मधली वाडी अशा ठिकाणी पाणी आल्याने मुख्य…

Read More
You cannot copy content of this page