Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीतील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत मिळावी…

सतीश सावंत:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡कणकवली ता.१७-: तालुक्यातील हरकुळ बुद्रुक,हळवल, कळसुली, शिरवल, साकेडी यांसह तालुक्यातील काही गावांमध्ये काल चक्रीवादळ होऊन ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले. हरकुळ बुद्रुक मध्ये ७५ घरांची छप्परे जमीनदोस्त झाली आहेत. प्रशासनाकडून त्याची पंचयादी घालण्याचे काम चालू आहे. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हरकूळ बु. सरपंच बंडू…

Read More

प्रंचड गर्मी असल्याने दुपारचा वीजपुरवठा खंडीत करु नये…

मंदार नाईक: विज बिल उशिरा भरल्यास ग्राहकांना त्रास देणारा अधिकाऱ्यांना उन्हाळ्याचा ग्राहकांची दया येत नाही का..? ⚡सावंतवाडी ता.१७-: सध्या प्रचंड गर्मी सुरू असून ऐन दुपारच्या वेळी विज पुरवठाही बंद करण्यात येत आहे. परिणामी, आजारी व्यक्तींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, महावितरण लोकांच्या आरोग्याशी खेळत असून दुपारच्या वेळेस विद्युत पुरवठा सुरळीत…

Read More

मांडवी खाडीत बुडणाऱ्या युवकाला जिवदान देणाऱ्या दाजी बटवलकरचा भाजपा च्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.१७-: वेंगुर्ला मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले युवक गौरव देवेंद्र राऊळ व यश भरत देऊलकर हे दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडु लागले, त्यावेळी त्याठिकाणी असलेले मच्छिमार दाजी बटवलकर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता गौरव देवेंद्र राऊळ या युवकास वाचवले . परंतु दुसरा युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर…

Read More

केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी सिताराम सावंत यांचा भाजपात प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.१७- : केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा माजी उपसरपंच सिताराम सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपचे युवा नेते तथा माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्य व विचांरापासून प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतला असून केसरी गावात भाजप पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास…

Read More

शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्याला शिक्षकांचा तीव्र विरोध…

प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष :अध्यापनावर परिणाम करणाऱ्या अनिष्ट कामांना बंदी घालण्याची केली मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १७“गुरुजींचा” समाजात मानसन्मान वाढवा, यासाठी त्यांचे रंगीत फोटो शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अशाने सन्मान वाढतो, हा गैरसमज असून याला आमचा तीव्र विरोध आहे. यापेक्षा अध्यापनावर अनिष्ट परिणाम करणारे कोणतेही काम शिक्षकांना देणार…

Read More

लोकसभेची आचारसंहिता शिथिल करून शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा करा…

प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १७लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही आचारसंहिता शिथील करून प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग मोकळा करावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर व जिल्हा सरचिटणीस…

Read More

पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी शासकीय भूखंड द्या…

पत्रकारांच्या वैनतैन सहकारी संस्थेची मागणी:मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था सावंतवाडी संस्था सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यरत करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात शासकीय भूखंड ची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातले निवेदन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले.या संस्थेचे जेष्ठ सदस्य गजानन नाईक व…

Read More

चालकांच्या बेशिस्तीमुळे देवगडात वाहतूक कोंडी…

वाहतूक पोलिसांची झाली तारेवरची कसरत:नगरपंचायतने तोडगा काढण्याची होत आहे मागणी.. ⚡देवगड ता.१७-:देवगड आठवडी बाजारात वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागला आठवडा बाजार आणि पर्यटकांची वाढलेली गर्दी यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी जाणवली वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.मात्र वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवत असल्यामुळे वाहतूक पोलीस विशाल वैजल यांना तारेवरची कसरत…

Read More

भालावलं येथे नदीपात्रात परप्रांतीय तरुणाचा बुडून मृत्यू …

⚡बांदा ता.१७-: भालावलं येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. परदेशीया जितू उराव (वय २०, मूळ राहणार सुपा – झारखंड, सध्या रा. भालावल) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत भालावलं येथील उदय परब यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परदेशीया हा उदय परब यांच्या…

Read More

1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन लवकर होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि.१५ एप्रिल २०२४ ते दि.१४ जुन २०२४ (दोन्ही दिवस धरुन) तसेस पश्चिम किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि. १ जून २०२४ ते दि.३१ जुलै २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ)…

Read More
You cannot copy content of this page