⚡कुडाळ ता.२८-: येत्या पावसाळ्यात विजेचा खेळखंडोबा तसेच वीज समस्या जाणवू नये यासाठी गुरुवार, ३० मे रोजी महावितरणच्या एमआयडीसीतील कुडाळ कार्यालय येथे अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात येणार आहे.
यावेळी महावितरण विभागाने वीज खंडीत होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा होईल. आपल्या ग्राहकांना सुयोग्य देण्यासाठी वीज बिल, खंडीत सेवा यावर महावितरणने लक्ष देणे महत्वाचे ठरेल. यासाठी गुरुवारी सकाळी १० वाजता वीज ग्राहक अणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी केले आहे.
