महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्या सोडविण्यासाठी २५ जूलैला उपोषण

जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष नागेश मोरये यांचा इशारा

⚡कणकवली ता.२३-: महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही . या सर्व मुद्द्यांबाबत लेखी स्वरुपात समाधानकारक उत्तरे द्यावीत . अन्यथा २५ जूलैला कणकवली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असून नांदगांव पंचक्रोशीतील नागरिकही माझ्यासमवेत साखळी उपोषणास बसतील , असा इशारा जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जि . प . सभापती नागेश मोरये यांनी महामार्गचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे .

निवेदनात म्हटले आहे , महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या सध्यस्थितीबाबत आम्ही यापूर्वीही तक्रारअर्ज केले आहेत . मात्र अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही . नांदगांव मोरयेवाडी येथे हायवेला पूर्वी सहा पाईप होते . पण , ते रद्द करुन साईडच्या गटाराला जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाच फुट रस्ता पाण्यात जातो . तेथील काही घरांभोवतीही पाणी साचते . नांदगांव तिठा येथील श्री देव कोळंबा मंदिर ते खानोलकर घरापर्यंत दुतर्फा गटार व्यवस्थित न बांधल्यामुळे , फाऊंडेशन चुकीच्या पध्दतीने वापल्यामुळे , निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे गटारे तुंबलेली आहेत . नजीकच सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे . पण , संपादित जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत तेथे काम करण्यात येऊ नये . नांदगाव येथील सर्व्हिस रोडची रुंदीही कमी आहे . जोडरस्त्यांची उंची वाढविण्याची व डांबरीकरणाची गरज आहे . हायवेपासून दाट वस्ती असलेल्या भागापर्यंत रस्त्याला दिवाबत्तीची सोय केलेली नाही . ओटव माईण फाटा ओव्हर ब्रिजवरील स्ट्रीट लाईट कायम बंद असते . रस्त्याच्या बाजूला असलेली नळयोजनेची पाईप लाईन गटाराचे बांधकाम करतेवेळी वारंवार खोदून पाईप लाईन नादुरुस्त होत आहे . पुल , मोऱ्या चुकीच्या बांधलेल्या आहेत . त्यामुळे पाणी साचून अनेकांचे नुकसान होत आहे . नळयोजनेची लोखंडी पाईप लाईन चुकीच्या पध्दतीने घातलेली आहे . पाण्याचा प्रवाह उलट दिशेने फिरवल्याने नांदगांव येथील शाळा इमारतीचे नुकसान होत आहे . शाळेच्या जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही . संपादीत जमिनीचा मोबदला केव्हा पाठवला याची माहिती मिळावी व चुकीचे काम करणारे अधिकारी , ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी . चुकीने केलेल्या कामाबाबत कंत्राटदार व शाखा अभियंत्यावर कडक कारवाई व्हावी . ओटव माईण ब्रीजवरून येणारे पाणी शाळा शाळेच्या इमारतीत घुसत आहे . गटारे पक्की नसल्याने देव कोळंबा परिसरात व बाजूच्या शेतात पाणी घुसत आहे . काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता आहे . नांदगांव येथील ओव्हरब्रीजचे काम चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे नविन हायवेची जागा शिल्लक राहिली . त्यामुळे आता नव्याने संपादन करावे लागते . कार्यकारी अभियंता श्री . ओटवणेकर यांच्या मनमानी कारभारामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी . नांदगाव तिठा ब्रिज ते बेळणे हद्दीपर्यंत हायवेच्या मध्यापासून किती मीटर जागा संपादित केली , सर्व्हिस रोडसाठी किती जागा संपादीत केली याची लेखी माहिती मिळावी . सर्व्हस रस्ते व्यवस्थित केलेले नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे . रिक्षा स्थानक उपलब्ध करून देण्यात यावे . नांदगांव तिठ्यावर अंडरपाईप टाकल्याने पाणी निचरा होणे कठीण झालेले आहे . नांदगाव शाळा नं १ समोर झेब्रा लाईन व डांबरीकरण त्वरीत करावे . यापूर्वी नांदगांव सरपंच यांनी समस्यांबाबतचे पत्र पाठवले होते . पण , याबाबत योग्य स्पष्टीकरणही मिळालेले नाही . पूर्वी जे नाले वंशपरंपरेने वाहत होते त्या ठिकाणी चर काढून दुसऱ्या नाल्याला जोडल्यामुळे प्रवाह बदलून इतर ठिकाणी पाणी सोडलेले आहे . त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे . वरील मुद्याबाबत लेखी स्वरुपात समाधानकारक उत्तरे मिळावीत . अन्यथा उपोषणाला बसणार असून याबाबत वेगळी नोटीस दिली जाणार नाही . त्यावेळच्या परिणामास सर्वस्वी महामार्ग विभाग जबाबदार राहील , असेही निवेदनात म्हटले आहे .

You cannot copy content of this page