*⚡कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारळी पौर्णिमा ज्याप्रमाणे उत्साहात साजरी केली जाते त्याचप्रमाणे यावर्षी कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलाव या ठिकाणी ग्रामस्थांच्यावतीने नारळ अर्पण करून साजरी करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी येताना श्रीफळ घरातून घेऊन यायचे आहे. हा कार्यक्रम रविवार 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण म्हणून नारळ लढवण्याची स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहे कोरोनाचे सर्व नियम व अटी यांचे पालन करून म्हणजेच तोंडाला मास्क आणि हात निर्जंतुकीकरण करून सर्वांनी यावे असे आवाहन करण्यात आहे आहे.
ओसरगाव तलाव येथे ग्रामस्थांच्यावतीने नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करणार
