भारताचा दणदणीत विजय,

इंग्लंडला चारली धुळ

*⚡लंडन दि.१६-:* भारतीय संघाने आज अफलातून खेळ करत आम्ही कधीही सामन्यात पुनरागमन करु शकतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद ६७ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण भारताच्या गोलंदाजांनी सातत्याने भेदक मारा करत इंग्लंडला १२० धावांमध्ये ऑलआऊट केले आणि १५२ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताचा भरवश्याचा फलंदाज रिषभ पंत (२२) हा लवकर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्माने (१६) काही काळ तग धरून राहण्याचा प्रयत्न केला. पण इशांत शर्माला बाद केल्यावर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी जिद्दीने फलंदाजी करत खेळपट्टीवर बराच वेळ तग धरला. जे रोहित शर्मा, विराट कोहली यांना करता आलं नाही ते यावेळी शमीने करून दाखवलं. कारण शमीने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावत इंग्लंडला चोख उत्तर दिलं. शमी आणि बुमरा यांनी यावेळी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शमीने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. बुमरानेही यावेळी शमीला चांगली साथ दिली, बुमराने तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ३६ धावा केल्या. लंचच्यावेळी भारताने यावेळी ८ बाद २९८ या धावसंख्येवर आपाल डाव घोषित केला आणि इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले. भारताच्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची २ बाद १ धाव अशी दयनीय अवस्था केली होती. त्यानंतर काही काळ इंग्लंडता कर्णधार जो रुट हा खेळपट्टीवर ठाण मांडून होता, पण यावेळी बुमराने रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद केले आणि भारताला मोठे यश मिळाले. इंग्लंडची ५ बाद ६७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एकाच षटकात इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद केले आणि सामना भारताच्या दृष्टीपथात आला होता.

You cannot copy content of this page