खासकीलवाड्यातील रखडलेल्या विकासकामांना अखेर गती..

आशिष सुभेदार यांच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन जागे..

⚡सावंतवाडी ता.०९-:
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकांमाबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी आवाज उठविल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुभेदार यांनी दिलेल्या इशारा नंतर प्रभागातील विकासकामाना सुरुवात करण्यात आली आहे.
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात गटबाजी असल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती त्यात ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीमुळे अर्धवट स्थितीत तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यात नगरसेवक यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने त्याचा फटका या प्रभागातील विकासकामांवर होत आहे. असा आरोप शिवसेना ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केला होता तर प्रसंगी याला प्रशासन जबाबदार असल्याचे ही त्यांनी म्हटले होते. अनेक विकासकामे यांचे टेंडर वर्क ऑर्डर झाली मात्र कामे सुरू करू नये असे आदेश पालिकेतून आल्याने ही कामे रखडली होती. आता पावसाळा जवळ आला विकासकामे तसेच पाइप लाइनची कामे पूर्ण होणार कधी असा सवाल सुभेदार यांनी केला. कचऱ्याची दुर्गंधी, लाइन वरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईन ची कामे, अर्धवट गटार बांधकाम हे प्रमुख कामे रखडली आहेत तर खोदाई देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या प्रभागात स्थानिक नगरसेवक निवडून दिले आहेत मात्र ते गटबाजीतच गुंतल्याने याचा परिणाम स्थानिक विकासकामांवर होत आहे. काही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही कामे न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन मुख्याधिकारी याना घेराव घालण्याचा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला होता. या इशारा नंतर पालिका प्रशासन जागे झाले आहे. त्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून जोमाने विकासकांमाना सुरुवात करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला गांभीर्य नसल्याने चुकीच्या खोदाई मुळे ज्युस्तीन नगर येथे शनिवारी पाइपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना जुस्तीननगर कमानी समोर घडली. पाणी टंचाई असताना अशी घटना घडणे नागरिकांच्या हिताचे नाही त्यांना त्रास देण्याचे प्रकार आहेत असा आरोप देखील करत प्रशासनाने व ठेकेदाराने यावर गांभीर्याने लक्ष द्यावे. पुन्हा असा प्रकार घडू नये याचे गंभीर्याने प्रशासनाने लक्ष द्यावे पाणी समस्या गंभीर असल्याने संतप्त नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page