⚡मालवण ता.२६-:
आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून कच्चे बंधारे बांधण्यात आले. यामुळे या परीसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र परब यांसह इतर कर्मचारी, पो. पाटील विठ्ठल धुरी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
