मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रांत अधिकारी यांना निवेदन..
कुडाळ : अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा, अशी मागणी मनसे पदाधिकारी यांनी कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध वाळु उत्खननातून पैशाने गब्बर झाले असल्याचे दिसुन येते. पावसाळ्यात रस्ते खराब होत आहेत. या कारणाने पावसाळ्यात तरी निदान अवैध वाळु वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्थाकडुन विनंती केली तरी, पैशाच्या जोरावर, प्रशासन आपले काही करु शकत नाही, अशा अविर्भावात पावसाळ्यात देखील वाहतूक, उत्खनन बंद ठेवण्यास तयार नाहीत.
कायद्याचा धाक नसल्याने हा उन्मत्तपणा वाढला असून
यावर लगाम घालण्याकरीता नवीन कायद्याची कडक अंबलबजावणी करण्यात यावी. जेणे करुन यावर आळा घालता येईल. असे निवेदनात म्हटले आहे.
मनसे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांच्या नेतृत्वाखालील आज प्रांत यांची भेट घेण्यात आली. यावेळेस मनविसे तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर, सुशांत परब, विष्णू मस्के ,जितू नेवगी उपस्थित होते.
