गौरीशंकर खोत:घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न..
⚡कुडाळ ता.१०-: आ.वैभव नाईक यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रूपयाची विकासकामे कामे पाहून नारायण राणे यांना धडकी भरली असून आपली घराणेशाही चालण्यासाठी माजी केंद्रीय उद्योगमंत्र्यांला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे अशी टीका गौरीशंकर खोत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की कुडाळ-मालवणच्या जनतेला नारायण राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.
