राजन तेली:राणेंच्या मुलानी आम्हाला संपवायची रणनीती केली..
⚡सावंतवाडी ता.०१-: राणेंनी केसरकरांच्या वडीलांचा उद्धार गांधी चौकात केला. तर केसरकरांनीही राणेंचा उद्धार कसा केला हे जनतेला ठाऊक आहे. राणेंच्या मुलानी आम्हाला संपवायची रणनीती केली आहे. जे राणेसमर्थक आहेत त्यांनीही याचा विचार करावा.असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले.दरम्यान
नारायण राणेंना मुंबईच महापौर व्हायचं होतं. पण, आम्ही त्यांना येथून आमदार होण्यासाठी सांगत पुढाकार घेतला. असे तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.
