कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी….
विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०६ -:* शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा…
