मळगाव घाटीतील धोकादायक झाडे हटविण्यास सुरूवात…

वनविभागाचा पुढाकार: ग्रामस्थांमधून समाधान.. ⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव घाटीतील धोकादायक झाडे आज अखेर सावंतवाडी वनविभागाकडून हटविण्यात आली सदरचे झाडे तोडा अशी मागणी दिले कित्येक वर्ष वाहन चालक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थातून करण्यात आली होती दरम्यान याबाबत वनविभागाने पुढाकार घेऊन धोकादायक ठरणारी काही झाडे व फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. लवकरच इन्सुली व ओटवणे…

Read More

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू…

⚡बांदा ता.२४-: कोकण पदवीधर मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, युवा कार्यकर्ते सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, राकेश…

Read More

जिल्हास्तरीय 18 वर्षा खालील अभंग गायन स्पर्धेत भाविक गजानन मेस्त्री प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२४-: राधारंग फाऊंडेशन, सिंधुदूर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या तर्फे शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी 18 वर्षा खालील मुला मुलींसाठी “प्रभाकर वेलींग यांच्या स्मृति प्रीत्यर्थ” अभंग गायन स्पर्धेचे आयोजन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी येथे करण्यात आले होते, या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु भाविक गजानन मेस्त्री (तेंडोली) ह्याने…

Read More

नियोजनशून्य कारभारामुळे कुडाळ आगार तोट्यात…

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना देखील बसतोय फटका.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ आगाराचा तसेच राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढण्यामध्ये चालक-वाहक यांच्यापेक्षा अधिकारीच जास्त दोषी असल्याचे दिसून येत आहे. नियोजन शून्य कारभार हे यामागचे याच प्रमुख असल्याचे दिसून येत आहे. अशा नियोजन शून्य कारभारामुळे कुडाळ आगारचा मे २०२४ चा तोटा ५७ लाख ६३ हजार ४३५ रुपये एवढा…

Read More

पिंगुळी आणि बंबुळी येथे शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप…

⚡कुडाळ ता.२४-: पिंगुळी आणि बंबुळी या गावांमध्ये शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अॅड. यशवर्धन जयराज राणे आणि त्यांच्या युवाफोरम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते. पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकामात मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकरी पावसाळ्यात पिकांची काळजी घेताना पावसात भिजून काम करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. याच पार्श्वभूमीवर,…

Read More

पत्रकारितेच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा…

मोहन होडावडेकर:साळगाव येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२३-: लोकशाहीतील तीन स्तंभांना जागेवर ठेवण्याचे काम चौथा स्तंभ असलेला पत्रकारिता करत आहे. पत्रकारीता हे एक दुधारी शस्त्र आहे. पत्रकारीतेचा अनेक सकारात्मक विषयासाठी वापर करता येतो याचा अनुभव अनेकदा येतो. मात्र ती अजुनही सक्षम होणे गरजेचे आहे . या बदलत्या पत्रकारितेला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पिढीने…

Read More

महसुलच्या आशीर्वादाने वाळू तस्करी…

मनसे उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा आरोप.. मालवण दि प्रतिनिधीमहसुल प्रशासनाच्या आशीर्वादाने जिल्हयातील बहुतेक भागात राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील संबंधित गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या पूर्ण सहकार्याने वाळू तस्करी राजरोस सुरु असल्याचा आरोप करून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनीवाळू तस्करीत महसूलचे कर्मचारीच सामील असतील तर वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी जाऊन…

Read More

कुंभारमाठ धनगरवाडी महिलांना पावसापासून संरक्षण साहित्याचे वाटप…

मालवण (प्रतिनिधी) महिलांसाठी कार्यरत असलेल्या मालवण मधील माय माऊली महिला सबलीकरण संस्थेतर्फे मालवण कुंभारमाठ धनगरवाडी येथील धनगर समाजातील महिलांना शेती व इतर पावसाळी कामांमध्ये पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी प्लास्टिक खोळ वितरित करण्यात आले. माय माऊली महिला सबलीकरण ही संस्था महिलांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असून धनगर समाजातील महिलांना कोणत्या समस्या उद्भवल्यास त्यांनी मदतीसाठी संस्थेशी संपर्क करावा,…

Read More

मालवण जेटी येथे बुडणाऱ्या पर्यटकांचा वाचविला जीव…

हर्ष कुबल याच्या धाडसाचे कौतुक:हर्ष देवगड शेठ. म.ग.हायस्कूलचा विद्यार्थी असल्याने प्रशालेच्या वतीने केला गौरव.. ⚡देवगड ता.२३-: देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारा हर्ष शिवाजी कुबल याने मे महिन्यामध्ये मालवण येथील जेटीवर बुडणाऱ्या एका पर्यटकांचा जीव वाचविल्याबद्दल संस्थेच्या स्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ…

Read More

अंगी शिस्त बाणवल्यास जीवनातील संकटांवर मात करणे शक्य…

श्रीपाद गिरसागर:मालवणात संस्कृत विषयातील गुणवंतांचा सन्मान.. ⚡मालवण ता.२३-: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. आपल्या अंगी शिस्त बाणावली पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटे व अडचणी यावर आपण सहज मात करू शकतो, असे प्रतिपादन माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर यांनी येथे बोलताना केले. नगर वाचन मंदिर मालवण आणि…

Read More
You cannot copy content of this page