शाहू महाराजांच्या योजनांची माहिती प्रत्येक घटकाला आवश्यक…
समतादुत सगुण जाधव यांचे प्रतिपादन.. ओरोस ता.०३-: छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपण जोपासूया.असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत सगुण जाधव यांनी श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे बोलताना केले.सामाजिक न्याय विभाग व…
