Global Maharashtra Breaking News

भुईबांवडा पहिलीवाडीतील शेवरीचा कापाट येथील अर्धा डोंगर खचला

सुदैवाने जीवीत हानी नाही झाडे पडल्याने लाखोंचे नुकसान *💫वैभववाडी दि२५-:* कोकणात गेल्या आठ दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी मध्यराञी भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग खचून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.वस्तीपासून डोंगर लांब असल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १२रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा या भागात एक रुग्ण सापडला असून ग्रामीण भागात तळवडे २, माजगाव ३, मळगाव ४, कोलगाव १, कवठणी १ असे रुग्ण…

Read More

“मल्हारी’ पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात रहदारी सुरू करणार

आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून निघाला मार्ग *💫कणकवली दि२५-:* कणकवली तालुक्यातील कनेडी – नाटळ मार्ग जोडणारे मल्हारी पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोबत घेत आम.वैभव नाईक यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. व तात्काळ उपाययोजना म्हणून या कोसळलेल्या पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात मोटारसायकल व चालत जाणाऱ्या लोकांची रहदारी सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या…

Read More

कुडाळ येथे इंधन दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन…

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी;जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत गावडे व महिला अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांचा आंदोलनात सहभाग कुडाळ : इंधन दरवाढी विरोधात आज शहरात जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘बैलगाडी-सायकल मोर्चा” आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या खांद्याला खांदा लावून सिंधदुर्ग महिला काँग्रेस…

Read More

पुराचे पाणी विहिरीत गेल्याने बांदा येथे पिण्याच्या पाण्याचे झाले हाल

कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पाणी केले उपलब्ध *💫बांदा दि.२५-:*   तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा येथे दोन दिवसांपूर्वी पूर आला होता. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले होते. पुराचे पाणी विहिरीत गेल्याने तेथील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. यावेळी आज कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी त्या गावात जाऊन पिण्याचे पाणी उपलब्ध…

Read More

तेर्सेबांबर्डे येथील नुकसानग्रस्तांची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करावी…

तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांची मागणी_ *💫कुडाळ ता.२५-:* तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त मालमत्तांची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करून सत्यता पडताळणी केल्याशिवाय तेर्सेबांबर्डे येथील त्या अकरा नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत अदा करू नये, अशी मागणी तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. या विषयी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे…

Read More

बावशी रेशनिंग प्रकरणी उद्यापासून आमरण उपोषण

कणकवली 25 जुलै (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास व मुदतवाढ देणार नाही असे लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्याने नियोजित २६ जुलै रोजीचे ग्रा‌.पं.येथे होणारे आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या बावशी रेशनिंग दुकान प्रस्ताव प्रकरण राजकारण चांगलेच तापणार असल्याचे…

Read More

कसवणमध्ये 27 रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*💫कणकवली दि.२५-:* जिवन आधार आरोग्य सेवा संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कसवण – तळवडे गावातील गरजू ग्रामस्थांना २७ जुलै २०२१ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सदरचे वाटप मिलिंद बाळकृष्ण सावंत कसवण (सावंतवाडी ) यांच्या सौजन्याने होणार आहे. कसवण शाळा नंबर 2 मध्ये सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास कणकवली तालूका पत्रकार…

Read More

सतिश सावंत करणार ४००० जायफळ कलमांचे वाटप

बीडवाडी येथे केला शुभारंभ;गुणवंत मुलांचा सत्कार *💫कणकवली दि.२५-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावतीने ४००० जायफळ कलमांचे वाटप होत आहे. याचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय बीडवाडी सभागृह येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्याहस्ते झाला. तसेच कार्यक्रमामध्ये गुणवंत मुलांचा सत्कार व पुरामध्ये नुकसान झालेल्या मणचेकर कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी…

Read More

साळिस्ते स्मशानभुमीकडे जाण्यासाठी बांधलेली मोरी वाहून गेल्याने गैरसोय

निष्कृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी *💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावातील स्मशानभुमिकडे जाण्यासाठी बांधलेली मोरी एका वर्षातच पहिल्याच पावसात दोन वर्षांपूर्वी वाहून गेली. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला लेखी कळवून त्याला एक वर्ष होऊन गेले तरीही त्याकडे लक्ष न घातल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तरे न…

Read More
You cannot copy content of this page