Global Maharashtra Breaking News

ओटवणे व सरमळेतील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याने राबविला उपक्रम *⚡सावंतवाडी ता.१२-:* मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व संतोष भैरवकर यांच्या विनंतीवरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे व सरमळे गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत कार्य करण्यात आले. अचानक महापूर आल्याने घरे मांगर उध्वस्त होऊन प्रचंड वित्तहानी झाल्याने पूरग्रस्तांचे नुकसान झाले…

Read More

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये  

भाजपा आम. नितेश राणे यांचा इशारा *⚡कणकवली दि.१२-:* केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असल्याने आघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरु करायला हवी होती. मात्र आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोमन इच्छाच नसल्याने हे सरकार वेळकाढूपणा करत बसले आहे.आघाडी सरकारने मराठा समाजाच्या संहनशीलतेची आणखी परीक्षा…

Read More

जीएसटीच्या अंतिम मूल्यांकनापर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के राखून ठेवण्याची अट शिथिल करा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *⚡मालवण ता.१२-:* राज्याच्या अविकसित भागात उद्योग सुरु करण्यासाठी शासनाकडून २०१३ व २०१९ ला प्रोत्साहन योजना सुरु केली. सध्या या योजनेसाठी जीएसटीच्या अंतिम मूल्यांकनापर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के राखून ठेवण्याची अट आहे. मात्र जीएसटीचे अंतिम मूल्यांकन होत नाही तोपर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के रक्कम मिळत नसल्याने…

Read More

केंद्र सरकारने १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा

ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांची मागणी *⚡मालवण ता.१२-:* देशातील ३ लाख ग्रामीण डाक सेवकांना जानेवारी २०२० पासूनचा महागाई भत्त्याचा १८ महिन्याचा फरक मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे….

Read More

सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांचे आजपासून आमरण उपोषण

वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने उपोषण *⚡दोडामार्ग ता.१२सुमित दळवी-:* साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली आज साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भर पावसात पं.स.दोडामार्ग येथे आंदोलन करण्यात आले…

Read More

ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट सेल्फ ग्रुप संस्थेने दिली बांदा गावाला भेट

घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत करण्यात आले नियाेजन *⚡बांदा दि.१२-:* ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट लोकल सेल्फ ग्रुप कोल्हापूर संस्थेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन गाव आराखडा तयार करणेबाबत बांदा गावाला भेट देण्यात आली. या भेटी दरम्यान गावातील कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेबाबत नियाेजन करण्यात अाले. गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय, गृहभेटी स्वच्छतेच्या सुविधा या घटकांची प्रत्यक्ष पाहणी…

Read More

जप्त करण्यात आलेले सामान पंचनाम्याच्या कागदपत्रसहित पुन्हा मिळावे

रवी जाधव यांचे भर पावसात पालिकेसमोर उपोषण सुरू *⚡सावंतवाडी ता.१२-:* बाजारपेठेतील स्टॉल काढून जे जप्त करण्यात आलेले समान पंचनामे कागदपत्र सहित पुन्हा मिळावे यासाठी रवी जाधव यांनी आपले उपोषण भर पावसात येतील पालिकेसमोर सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत पंचनाम्याच्या कागदपत्र सहित जप्त सामान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही…

Read More

खनिकर्म विभागाने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही पूर्तता नाही

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेतर्फे १५ रोजी उपोषण *⚡वेंगुर्ला दि.१२-:* रेडी येथील खाण कंपनीने बेजबाबदार व मनमानीपणे तेथील शेतक-यांच्या खाजगी जमिनीत खनिजयुक्त चिखलाचे पाणी सोडल्याने ८ ते ९ एकर शेतजमीन नापिक झाली आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म निधीतन या शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी…

Read More

खर्डेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रथम आलेल्या रुपाली मोकाशी पाटीलचा सत्कार

*⚡वेंगुर्ले ता.१२-:* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रथम आलेल्या रुपाली मोकाशी पाटील यांचा सत्कार महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी तिच्या घरी जाऊन पुष्पगूच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मुळात शिक्षणाची आवड व जिद्द असल्यामुळे तब्बल वयाच्या 41 साव्या वर्षी 12 वी कला शाखेतून महाविद्यालयात प्रथम आल्या. याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रात अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक…

Read More

अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू वाटप

*⚡कणकवली दि.१२-:* सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपत अस्तित्व प्रतिष्ठान (रजि.) मुंबईच्या माध्यमातून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना स्टिलच्या टाक्या, बादल्या, प्लॅस्टिकचे डब्बे, ब्लँकेट, टॉवेल, चटई, गाऊन, सॅनिटरी पॅड, अन्न धान्य तसेच काही भांडी अन् बिस्किट अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. कोकणात महाप्रलयकाळी पावसाने हाहाकार माजवून पुरस्थिती निर्माण झाल्यांने तसेच दरड दुर्घटनेमुळे…

Read More
You cannot copy content of this page