Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.6990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 1.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 78.1357, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे….

Read More

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.325 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3109.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. वेंगुर्ला – 10.6(2466.8), वैभववाडी –…

Read More

जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

तर शमिका चिपकर द्वितीय आणि वेदांगी कविटकर तृतीय *⚡सावंतवाडी ता.२५-:* छत्रपती सेवा प्रतिष्ठान माणगाव आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन कथा कथन स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीची पाचवीची विद्यार्थिनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुडाळ हायस्कुल ची शमिका सचिन चिपकर हिचा द्वितीय तर हळदीचे नेरूर केंद्रशाळेची वेदांगी प्रवीण कविटकर हिने तृतीय क्रमांक पटकवला आहे. मावळ्यांच्या शौर्य…

Read More

जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२४-:* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी , यासाठी आजपासून ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (३) नुसार मनाई आदेश लागू केल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.* पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय…

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

कुडाळ रस्त्यावर टायर जाळून केला ठाकरे सरकारचा निषेध *⚡कुडाळ ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. यातच मुंबई गोवा महामार्ग भाजप कार्यकर्त्यांनी रोखला असून, कुडाळ येथे रस्त्यावर टायर जाळून ठाकरे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आहे.

Read More

खासदार विनायक राऊतांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या

बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी *⚡सिंधुदुर्ग दि.२४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचं जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या…

Read More

दोडामार्ग येथे भाजप सेना आमने सामने

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राडा टळला *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देऊन जोरदार निदर्शने केली. या नंतर देखील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मौन पाळले होते. पण आंदोलन वेळी शिवसेना पदाधिकारी यांनी नारायण राणे यांच्यावर वैयक्तिक टिका केली केली त्यामुळे संतापलेल्या भाजपाचे पदाधिकारी…

Read More

‘प्रेरणा’ अंतर्गत एमपीएससीसाठी फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन

अभ्यासासोबतच स्वतःसाठी किमान एक तास देणे महत्वाचे-:सुधीर पाटील *⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* एमपीएससीचा अभ्यास करत असताना अभ्यासासोबतच स्वतःसाठीही दिवसातील किमान एक तास देणे आवश्यक असल्याचे देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर सुभाष पाटील आणि…

Read More

उद्योगांसाठी भूखंडावर ४० टक्के बांधकामाची अट २० टक्के करू – उद्योगमंत्री सुभाष देसाई

*⚡मालवण ता.२४-:* महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात  उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याकडे आज मंगळवारी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमालवलीनुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.  महाराष्ट्र…

Read More

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा. परंतु, 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार…

Read More
You cannot copy content of this page