Global Maharashtra Breaking News

कोळंब पुलाखालील मातीचा भराव काढण्याच्या मागणीसाठी २२ रोजी खाडीत उतरून आंदोलन

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कोळंब खाडीतील मच्छीमारांनी दिला इशारा *⚡मालवण ता.१८-:* कोळंब पुलाच्या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार एवढा निधी खर्च करूनही पुलाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून कामाच्या वेळी ठेकेदाराकडून पुलाच्या खाली कोळंब खाडीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्यापही काढलेला नाही. यामुळे खाडीपात्रातील मासेमारीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे . या भरावामुळे पाण्याचा…

Read More

दशावतारी कलाकार विनायक येरागी याला युवा कला गौरव पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.१८-:* मालवण दांडी येथील तरुण दशावतार कलाकार विनायक उर्फ गोट्या येरागी याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनचा यावर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विनायक उर्फ गोट्या येरागी या तरुण कलाकाराने स्त्री अभिनयाच्या जोरावर दशावतार कलाक्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे. जिल्ह्यातील अनेक दशावतारी मंडळामध्ये त्याने स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनया बरोबरच…

Read More

भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस कोण करणार?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल;आता तरी मदतीचा हात पुढे करा! *⚡कणकवली ता.१८-:* लॉकडाऊनला १७/१८ महिने झाले.मात्र या कालावधी भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस करावी असे कुणालाही वाटु नये, याला काय म्हणायचे. ना कुणी विचार केला, ना मदतीचा हात पुढे केला,असे हात पसरल्या शिवाय काही आपण करणारच नाही, यालाच लोकशाही म्हणायचे? असा सवाल कणकवली…

Read More

एकाच सिट नंबरचे दोन रिझर्व्हेशन वैभववाडीत प्रवाशी आक्रमक;

खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच एसटीचा भोंगळपणा *⚡वैभववाडी ता.१८-:* गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणात दाखल होताना रस्त्यांची दुरवस्था पाहता चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शिवाय परतीच्या प्रवास देखील त्रासदायकच ठरत आहे. शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी वैभववाडी एसटी स्थानकात सायंकाळी…

Read More

वरवडे प्रा. आ. केंद्रात २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम *⚡कणकवली ता.१८-:* कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गरजूंना रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१८:* सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १ आणि ग्रामीण भागात चराठा येथे एक असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६८०कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन

सावंतवाडी न.प.च्या विविध कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन चौकशी अहवाल तयार करणार *⚡सावंतवाडी ता.१८-:* महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पामध्ये झालेल्या कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन तपासणी करून चौकशी अहवाल तयार करण्याचे काम चौकशी समिती प्रमुख आणि तहसीलदार तथा विशेष दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या समिती सदस्यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. यात नगरपरिषदेच्या…

Read More

सचिन जोईल यांच्या वतीने कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात अगरबत्ती व मोदक प्रसादाचे वाटप

*⚡देवगड ता.१८-:* देवगड तालुक्यातील कातवण ग्रामपंचायत सदस्य सचिन जोईल यांच्या माध्यमातून गणेशोत्सवा निमित्ताने घरोघरी जाऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप करण्यात आले आहे. सचिन जोईल यांच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी गणेश चतुर्थी निमित्ताने सचिन जोईल यांनी कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात गावोगावी जाऊन गणेश दर्शन घेऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप केले…

Read More

खास. विनायक राऊत यांनी चष्मा बदलावा म्हणजे केंद्र सरकारने दिलेला निधी व विकास दिसेल

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला;राज्य सरकारने एक रुपया तरी दिला का? *⚡कणकवली ता.१८-:* दोन वर्षांत राज्याला केंद्राकडून पैसे आले नाहीत असे म्हणणारे खास.विनायक राऊत कोणत्या चष्म्यातून बघतात ते समजत नाही. आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून ७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले.८० हजार कोटी लोकांना करोडो रुपये खर्च करुन केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे. देशात ६०…

Read More
You cannot copy content of this page