*💫कणकवली दि.२४-:* मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक त्याच भुयारी गटार जात कलनागरमध्ये. अजून थोडा ईडीचा तपास खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे,अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत निशाणा साधत केली. कणकवली येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेस आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी शोधमोहीम सुरु करण्या आली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, प्रताप सरनाईक किंवा वायकर हा एक मुखवटा झाला त्यांच्या मागचा जो मुख्य कलाकार आहे. ना तो कलानगरमध्ये बसला आहे .
प्रताप सरनाईक आणि वायकर हे मुखवटा,खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय – नितेश राणे
