*राजन तेलीच्या टीकेला पालकमंत्र्यांचे प्रतिउत्तर*
सावंतवाडी-: भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन टिका करण्यापेक्षा स्वतः फिल्ड वर येऊन काम करावे. अशा शब्दात त्यांच्या टीकेला पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कोरोना काळात राजन तेली यांनी किती योगदान दिले हे जनतेला माहिती आहे. कोरोना काळात जर एकत्र काम केले तर नक्कीच जिल्हातील कोरोनाचा आकडा निश्चित कमी होईल. त्यामुळे टिका करण्यापेक्षा स्वतः फिल्ड वर उतरून काम करावे अशी टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
