*जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी; पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सावंतवाडी दि.०४-:* जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफ्लींग प्लांड चे उद्घाटन ऑनलाईन द्वारे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या प्लांडचा भविष्यात देखील जिल्ह्याला फायदा होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून, जेवढ्या टेस्ट दिवसाला होत आहेत. त्यात कमी संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. तसेच येत्या चार दिवसात चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मदत निधी जिल्ह्याला प्राप्त होईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली आहे.
