स्वतःचे अपयश लपवण्यासाठी मोंडकर व तोरसकर यांच्याकडून दत्ता सामंत यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये…

शिवसेना पदाधिकऱ्यांची टीका:बाबा मोंडकर यांच्या सारख्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना हा विकास कधी समजला नाही..

⚡मालवण ता.२७-: शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत असल्याने भाजपचे बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर यांच्या सारखे स्वयंघोषित नेते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सामंत यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. मात्र यापुढे दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न झाल्यास बाबा मोंडकर यांनी बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयाबाबत जो काही विकास केला त्यावर आम्हाला बोलावेच लागेल, असा इशारा शिंदे शिवसेनेचे दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे, मंगेश कोयंडे, अरुण तोडणकर, प्रवीण पराडकर, भाऊ मोरजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

भाजपचे बाबा मोंडकर व रविकिरण तोरसकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे भाजपचे कार्यकर्ते फोडून त्यांचे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगून सामंत यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केल्याने महायुतीमधील भाजप व शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे, मंगेश कोयंडे, अरुण तोडणकर, प्रवीण पराडकर, भाऊ मोरजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मोंडकर व तोरसकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे कोणतीही समस्या मांडल्यास ती तात्काळ सुटते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जात असल्याने शिवसेनेकडे जनतेचा ओढा वाढत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत आहेत. आमदार निलेश राणेही दत्ता सामंत यांच्या कामाचे सातत्याने कौतुक करत आहेत. सामंत हे जिल्हाप्रमुख असल्याने शिवसेना पक्ष वाढवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते काम प्रामाणिकपणे ते करत आहेत. दत्ता सामंत हे विकासकामांची आश्वासन देतात आणि आमदार नीलेश राणे ती पूर्ण करतात, याला आमिष दाखवणे म्हणत नाही तर जनसेवा म्हणतात. बाबा मोंडकर यांच्या सारख्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना हा विकास कधी समजला नाही. मोंडकर यांनी मालवण जेटीवर जो काही विकास केला तो आम्हाला बोलायला लावू नका. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सुरु असलेली बेताल वक्तव्ये थांबवा, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दत्ता सामंत यांचे सामाजिक कार्य तळाशील येथील बंधारा उभारणी रूपाने जनतेने पुन्हा अनुभवले आहे. अनेक प्रसंगातून सातत्याने ते दिसन येते. त्यामुळे दत्ता सामंत यांचे उतुंग सामाजिक कार्य कोणीही कवेत घेऊ शकणार नाही. हे तोरसकर यांनी लक्षात घ्यावे व नंतर कवेत घेण्याची भाषा करावी. तळाशील येथे समुद्री अतिक्रमणमुळे गावचे दोन भाग अशी स्थिती असताना हे स्वयांघोषित नेते कुठे होते ? आतापर्यंत जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे जाहीर करावे. नुसतेच स्वतःला नेते म्हणवून घेऊ नये, अशी टिकाही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

भाजपा ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात गतिमान विकास होत आहे. उबाठा गटातून अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे महायुती भक्कम होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यांचे राजकीय वजन वाढत आहे. असे असताना दत्ता सामंत नेहमीच सांगतात आम्ही राणे यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांचा निर्णय आम्हाला नेहमीच सर्वोच्च आहे. हीच दत्ता सामंत यांची निष्ठा आहे. त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेल्या व जिल्हापरिषद निवडणुकीत ५०० मते देखील मिळू न शकलेल्या मोंडकर यांनी बेताल बडबड थांबवावी, तसेच रविकिरण तोरसकर यांनीही सेजल परब यांच्या भाजप प्रवेशाबाबत खोटे बोलणे थांबवावे, असेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page