आचरा पिरावाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून मोठे नुकसान…

⚡मालवण ता.०४-:
गेले तीन दिवस मालवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली आहे. आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा पिरावाडी येथील सौ. शलाखा विठ्ठलदास कांदळगावकर यांच्या राहत्या घराच्या छप्पराचे सिमेंट पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्याने आचरा परिसराला तडाखा दिल्याने काहींच्या छप्परांचे पत्रे उडून नुकसान झाले होते. आचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्याचा फटका किनारपट्टी भागाला बसत आहे. आजही वाऱ्यांचा जोर कायम राहिल्याने आचरा पिरावाडी येथील सौ. शलाखा विठ्ठलदास कांदळगावकर यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्याने सिलींगसह आतील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. यात २० सिमेंट पत्रे, दोन रुमचे फॉल सिलिंग, विद्युत उपकरण, लाईट फिटींग, बेड, कपडे आदी मिळून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत खबर मिळताच आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्या पुर्वा तारी, पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी, कोतवाल गिरीश घाडी यांसह ग्रामस्थ सायली सारंग,समिधा चौगुले, झहिर मुजावर, परेश तारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

You cannot copy content of this page